आतापर्यंत महाराष्ट्रातील २३ जिल्हे, तामिळनाडू आणि मध्यप्रदेशमध्ये २००हून अधिक ठिकाणी त्यांची या वरील विषयांवर व्याख्याने झाली आहेत. काही कॉर्पोरेट आणि गव्हर्नमेंट कंपन्यांसाठी त्यांनी "कॉर्पोरेट शिवाजीराजे" हा सेमिनार घेऊन त्यांची कार्यक्षमता वाढवण्यासाठी मदत केलेली आहे. या विषयांवर त्यांचे पुस्तकही प्रकाशित झालेले आहे आणि त्यास मराठी सुपरस्टार स्वप्नील जोशी यांची प्रस्तावना लाभली आहे. प्रसिद्ध मराठी उद्योजक श्री. अग्नेलोराजेश अथायडे (सेंट अँजेलोज कॉम्पुटर इन्स्टिटयूटचे संस्थापक) यांच्या आत्मचरित्राचे “समस्या ते संधी” नावाच्या पुस्तकाचे लेखन आणि शब्दांकन देखील यांनी केलेले आहे. १ जानेवारी २०१८ रोजी त्यांचे 'आय लीड मंत्र' नावाचे नवीन पुस्तक प्रकाशित झाले आहे. श्री. विनोद मेस्त्री यांची "श्री कॉमर्स अकॅडेमी" हि एक चेंबूर, मुंबईमधील नावाजलेली कोचिंग इन्स्टिटयूट मार्फत १६ वर्षे त्यांनी विद्यार्थ्यांना शालेय शिक्षणासोबतच त्यांच्या व्यक्तिमत्व विकासासाठीही "आय लीड माय लाईफ" आणि "शुभारंभ - एका नव्या जीवनाचा" या उपक्रमा अंतर्गत मदत केली आहेत.
महाराष्ट्र पोलिस नोकरीमध्ये असलेल्या पती-पत्नीमधील वाढते तणाव आणि घटस्फोट यांवर देखील त्यांनी "संवाद तुझा माझा" हा उपक्रम सुरु करून महाराष्ट्र पोलिसांची कुटुंब व्यवस्था भक्कम करण्यास मदत केलेली आहे त्यास महाराष्ट्राचे दिवंगत उप-मुख्यमंत्री आणि गृहमंत्री श्री. जीवनरंग-आय लीड ट्रेनिंग टीम मार्फत पोलिसांमध्ये नव्याने भरती होणाऱ्या लोकांसाठी आणि अधिकारी वर्गासाठी मृदू कौशल्यावर आधारित महाराष्ट्रातील १० पोलीस ट्रेनिंग सेंटर्स ठिकाणी ३-३ दिवसांचे ट्रेनिंग सेशन्स घेऊन पोलिसांना बौद्धिक, सामाजिक, आर्थिक, वैयक्तिक लाभ मिळवून देण्यास मदत करत आहेत. त्याखेरीज मुंबई पोलीस दक्षिण विभाग, मुंबई पोलीस समाज सेवा शाखा, मुंबई पोलीस समाज सेवा शाखा, महाराष्ट्र पोलीस अकादमी, पोलीस हेड क्वार्टर्स, सशत्र पोलीस विभाग येथे आजपर्यंत जवळपास १५००० पेक्षा जास्त पोलिसांना मार्गदर्शन केलेले आहे.
एक सक्षम पिढी घडवण्याची ताकद शिक्षकांमध्ये असते आणि त्यासाठी लागणारी आवश्यक कौशल्ये शिक्षकांमध्ये विकसित करण्यासाठी "सशक्त राष्ट्रनिर्मितीसाठी शिक्षक" या कार्यशाळेतून ते ६,५०० पेक्षा जास्त शिक्षकांना मार्गदर्शन करण्याचे काम करत आलेले आहेत.
श्री. विनोद मेस्त्री यांनी आतापर्यंत प्रसिद्ध सूत्रसंचालक उत्तरा मोने, समाजसेवक डॉ. अभय बंग आणि सिंधुताई सकपाळ, पोलीस महानिरीक्षक श्री. विश्वास नागरे पाटील, मराठी सुपरस्टार स्वप्नील जोशी, प्रसिद्ध सरकारी वकील श्री. उज्वल निकम आणि कॉर्पोरेट वकील श्री. नितीन पोतदार, ऍडगुरु भरत दाभोलकर, संगीतकार सलील कुलकर्णी, पोलीस डीजी श्री. अरविंद इनामदार, श्री. संजय गोविलकर (आतंकवादी कसाबला जिवंत पकडणारे), ई लोकांच्या मुलाखती आणि कार्यक्रमांचे सूत्र संचालन उत्कृष्टरित्या केलेले आहे.
“शिवाजी महाराजांची नीती आणि उद्योग” या विषयावर त्यांची १०७.१ अस्मिता वाहिनी वर ५ भागांत मुलाखत झालेली आहे. तसेच शिवाजी महाराजांची तत्त्वे आणि त्यांचा आजच्या युगात वापर या आशयावर bolmarathi.in या वेब पोर्टलवर मुलाखत झाली आहे.
सोशल मिडीयावर त्यांच्या व्हिडीओजना एकत्रित ४० लाखांहून अधिक व्ह्यूज आहेत. म्हणजे या मध्यमामार्फत त्यांनी ४० लाखांहून अधिक लोकांच्या जीवनाला स्पर्श केला आहे.
“आय लीड ट्रेनिंग्स अँड कन्सल्टिंग”चे संस्थापक म्हणून त्यांनी विविध माध्यमातून लाखो लोकांच्या आयुष्याला स्पर्श केला आहे आणि सशक्त राष्ट्रनिर्मितीसाठी आवश्यक एक सक्षम पिढी घडवण्यासाठी ते सतत झटत आहेत.
एक बिझिनेस कोच म्हणून लघु आणि मध्यम उद्योग समूहांना त्यांचे सिस्टिम्स निर्माण करण्यासाठी आणि विकास साधण्यासाठी ते बहुमुल्य मार्गदर्शन करत असतात.
भारतातील व्हाट्सअँप वर चालणारा पहिला नेतृत्व विकास कोर्स सुरु करण्याचा मान त्यांना जातो.
त्यांच्या कार्याची दखल घेवून ऑल इंडिया मिडिया कौन्सिलने मार्च २०१९ मध्ये लेखक आणि एकता म्हणून त्यांना राष्ट्रपातळी पुरस्कार देवून गौरविले आहे.